आंतरराष्ट्रीय समुदयाच्या मदतीने जगतोय पाकिस्तान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद

 

नुकतेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदचे ५८ सत्र संपन्न झाले. या सत्रात भारताने पाकिस्तानला काश्मीरच्या मुद्द्यावर समज दिली आहे. तसेच पुन्हा एकदा भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परिषदेत पाकिस्तानला सुनावले आहे. भारताने म्हटले, “पाकिस्तान आपल्या वर्तणुकीतून काहीच शिकत नाही. पाकिस्तान काश्मीरमध्ये वारंवार द्वेष पसरवतो. पाकिस्तान हे यशस्वी राष्ट्र नसून ते आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे.” 

भारताचे राजदूत क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर काश्मीर संदर्भात खोटी माहिती पसरवण्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, "पाकिस्तान नेहमीच आपला सैनिकी आणि दहशतवादी गट वापरून खोटी माहिती पसरवतो. पाकिस्तान OIC (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) चा दुरुपयोग करत आहे. या मंचाचा वापर तो आपला प्रचार करण्यासाठी करतो हे खूप संतापजनक आहे.” 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे 
या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने स्पष्टपणे सांगितले की जम्मू-कश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहतील. भारताने या प्रदेशांमध्ये झालेल्या अभूतपूर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला. पाकिस्तानच्या दहशतवादामुळे या प्रदेशातील सामान्य स्थितीला सुधारण्यात अडचणी येत आहेत. परंतु आम्ही या प्रदेशांचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहोत. 

भारताचा पाकिस्तानला सल्ला
भारताने पाकिस्तानला सल्ला दिला आहे. भारताने सांगितले, भारताविषयीच्या द्वेष आणि असुरक्षेच्या भावना पाकिस्तानने सोडून द्याव्या. त्यांनी पाकिस्तानी नागरिकांसाठी चांगले शासन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यागी म्हणाले, "पाकिस्तानने त्याच्या नागरिकांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. परंतु तसे न करता पाकिस्तान काश्मीर आणि भारताविषयी खोट्या गोष्टी पसरवण्यात वेळ वाया घालवत आहेत.” 

भारताचे लक्ष लोकांच्या प्रगतीवर
भारताने संयुक्त राष्ट्रात सांगितले की तो आपल्या नागरिकांसाठी लोकशाही, प्रगती आणि मानवी हक्क सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानला ही मूल्ये शिकावीत अशी सूचना भारताने केली. भारताने म्हटले की संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे अशा लोकांना पाकिस्तानने आश्रय देण्याऐवजी त्याच्या शासनाच्या गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे. 

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्र्याचे वक्तव्य
यापूर्वी, पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री आजम नजीर तारार यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी काश्मीरमधील लोकांच्या निर्णयाच्या हक्कावर जोर दिला होता. भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आणि काश्मीरमधील प्रगतीचे उदाहरण देत, त्याच्या संप्रभुत्वावर पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली.

भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी पाकिस्तानच्या दुष्प्रचार मोहिमेवर टीका केली. यावेळी त्यांनी म्हटले, “जम्मू आणि कश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि सदैव राहतील. पाकिस्तानला आपल्या देशात अस्थिरता आणि दहशतवादाच्या समस्यांवर लक्ष द्यायला हवे. तसेच, पाकिस्तानने आपली बयानबाजी थांबवून आपल्या नागरिकांवर होणाऱ्या परिणामांना त्वरित निराकरण करणे आवश्यक आहे."

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती
या परिषदेत भारताने म्हटले की पाकिस्तानला अंतरराष्ट्रीय मंचावर भारताविषयी खोट्या गोष्टी पसरवण्याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तान त्यांच्या आंतरिक संकटांचा समाधान करायला असमर्थ आहे. त्यांनी  भारताच्या बाबतीत हस्तक्षेप न करता त्यांच्या देशातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter