शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा भारताने केला निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

भारताने नुकतेच ५ फेब्रुवारीला बांगलादेश संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर हल्ला झाला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भारताने या तीव्र हल्ल्याचा निषेध केला आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले, “बांगलादेशच्या लोकशाही आणि स्वतंत्रतेच्या इतिहासाचा भाग असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर ५ फेब्रुवारी २०२५ ला झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकानाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच ते घर बांगलादेशच्या राष्ट्रीय साक्षात्काराचे प्रतीक आहे."

पुढे ते म्हणतात, “शेख मुजीबुर रहमान यांच्यामुळे तेथील लोकांमध्ये गौरवाने आणि अभिमानाचा आकार घेतला आहे. या घरावर झालेला हल्ला हा एक अत्यंत खेदजनक आणि अपमानजनक कृत्य आहे. आम्ही या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध करतो.” 

भारताने हल्ल्याच्या निषेधासोबतच बांगलादेशच्या राष्ट्रीय शांती आणि स्थिरतेसाठी काळजी व्यक्त केली. तसेच या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

५ फेब्रुवारी रोजी बांगलादेशाच्या ढाका शहरातील शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर एक हिंसक जमावाने हल्ला केला. धाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जमावाने घराच्या मुख्य गेटला तोडून आत प्रवेश केला आणि घरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. विशेषत: शेख मुजीबुर रहमान यांच्या प्रतिमा आणि घराच्या इतर ऐतिहासिक वस्तूंचा नाश करण्यात आला.  

जमावाने या हल्ल्याची कारण म्हणून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिनाच्या एका ऑनलाइन भाषणाचा संदर्भ दिला आहे. त्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर जमावाने शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर हल्ला केला.

यासंदर्भात बांगलादेशाने भारताला परिपत्रक देखील पटहावले आहे. यामध्ये त्यांनी लिहले, शेख हसिनाच्या वक्तव्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. 

५ तारखेच्या रात्री जमावाने एक उत्खनन यंत्र शेख मुजीबुर रहमान यांच्या घराच्या ढाच्याला धक्का देण्यासाठी आणला. यंत्राच्या सहाय्याने घराचे काही भाग पाडले गेले. घटनास्थळी पोलिसांच्या मदतीने जमावाला ताब्यात घेतले गेले. परंतु त्याच्या आधीच घरावर मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती.

 हे प्रकरण बांगलादेश आणि भारत दोन्ही देशांमधील राजकीय आणि सांस्कृतिक संबंधांवर देखील प्रभाव पाडू शकते. भारताने हल्ल्याच्या कारवाईला कडक शब्दात निषेध केला असला तरी बांगलादेश सरकारने शेख हसिनाच्या भाषणावरून होणाऱ्या विवादांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter