डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला १४ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले, "संविधानाचे शिल्पकार आणि समाजात समानता प्रस्थापित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आता देशभर सार्वजनिक सुट्टी असेल."
शेखावत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन देशातील जनतेच्या भावना लक्षात घेतल्या आहेत." बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची रचना करताना सर्वांना समान हक्क मिळावेत याची काळजी घेतली होती. त्यांच्या विचारांमुळे भारतात लोकशाही मजबूत झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजातील अस्पृश्यतेचा त्रास सहन करावा लागला. मात्र, शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपले आयुष्य घडवले आणि समाजसुधारणेसाठी मोठे कार्य केले.
त्यांनी इंग्लंडच्या कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले. बाबासाहेब हे दलित समाजातील पहिले वकील होते. ते केवळ कायद्याचे जाणकार नव्हते, तर एक उत्तम अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणाचे समर्थक होते. त्यांनी उपेक्षित आणि शोषित समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कोड बिल तयार झाल. यामुळे महिलांना समान अधिकार मिळाले. त्यांनी ‘मनुस्मृती दहन’, ‘महाड सत्याग्रह’ आणि ‘नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन’ यांसारखी अनेक ऐतिहासिक आंदोलने केली.
बाबासाहेब आंबेडकर यांनी नऊ भाषांमध्ये प्रभुत्व मिळवले होते आणि ते डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखले जाते. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील ‘चैत्यभूमी’ आणि नागपूरमधील ‘दीक्षाभूमी’ हे बाबासाहेबांच्या स्मरणार्थ उभारले गेले आहेत.
दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः मुंबईतील ‘चैत्यभूमी’ आणि नागपूरच्या ‘दीक्षाभूमी’ येथे लाखो अनुयायी एकत्र येतात. या दिवशी विविध ठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शासकीय कार्यालये, शाळा, बँका आणि खासगी क्षेत्रातील काही आस्थापनांना सुट्टी मिळेल. त्यामुळे लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चिंतन करण्याची आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. शिक्षण, समानता आणि लोकशाही यांना बळकटी देण्याचे कार्य ते आजही प्रेरणा देतात. त्यांच्या योगदानामुळेच आज समाजात सर्वांना समान हक्क आणि संधी मिळत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter